Saturday, August 20, 2022

मनोगत : अल्पारंभाच्या उपक्रमांविषयी : श्री. अविनाश गोसावी.

 

अल्पारंभा एज्यूकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेचा २०१८ साली उदय झाला. संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभाचे प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. 

संस्थेची उद्दिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत, त्यावर माझे मनोगत सादर करतो !! 

१) शैक्षणिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

२) सांस्कृतिक क्षेत्रांच्या कक्षेत, समाजोपयोगी उपक्रम राबविणे

३) 'आर्थिक साक्षरता-प्रचार आणि प्रसार' यासाठी उपक्रम राबविणे

संस्थेच्या वेबसाईटवर सुरुवातीचे वाक्य कार्याची प्रेरणा सदैव जागृत ठेवणारे आहे.  "केल्याने होत आहे रे...आधी केलेची पाहिजे...!" समर्थ रामदास स्वामींचे हे वाक्य आहे. यत्न तोची देव जाणावा. प्रयत्न करीत राहणे महत्वाचे आहे. अर्थसाक्षरता या मुलभूत-मौल्यवान संदेशाचा विचार व्यक्ती-व्यक्ती पर्यंत पोहचावा, अर्थ आणि आर्थिक बाब या बद्दलचा संदेह कमी व्हावा, अर्थिक बाबतीत कोणत्याही प्रकारचे अकारण द्वंद्व मनात असू नये, अर्थसाक्षरतेचे प्रमाण वाढावे !! असे घडत गेल्यास, समाज-जीवनावर व्यापक असा परिणाम होतो. म्हणून हे समाज उपयोगी काम आहे.  

मनो- Money वाचत असतांनारुजवात अर्थसाक्षरतेची हे शब्द समोर आले! आपण म्हणतो ना, बोली भाषेत रुजणे महत्वाचे. रुजवात करून देणे...म्हणजे मेळ जमवून देणे. जमलेला मेळ सांभाळणे. जपणे. टिकवून ठेवणे.आपण अर्थसाक्षरते बद्दल विचार करतो आहोत. आपली संस्कृती नितांत अर्थपूर्ण आहे.धर्मअर्थ , काम आणि मोक्ष हे चार परम् पुरुषार्थ सांगितले आहेत. अर्थकारणातील सच्चेपणा आणि स्व-प्रामाणिकता या दोन्ही गोष्टी आयुष्यावर मोठा परिणाम करतात.पर्ययाने याचा परिणाम कुटुंबावर, संबधित घटकांवर, आणि समाजावर होतोSWS Financial Solutions Pvt. Ltd. या व्यावसायिक संस्थेच्या कामास पूरक असे अल्पारंभाचे काम आहे. यातून तीन गोष्टी साध्य होतात.

१)     समाजातील घटकांना योग्य मदत

२)     कार्य-समाधान

३)     जन-संपर्क अभियान

People …People & People …What more ….! माणूस आणि त्याच्या भोवती असणारी परिस्थिती या दोन घटकांवर सकारात्मक काम होत राहणे हे सदैव उपयुक्त आहे. माणूस समंजस होत जाणे महत्वाचे. सर्वपल्ली राधाधाकृष्णन म्हणतात"More we understand each other …More we feel we are like one another….!” असाच काहीसा विचार पैसा आणि माणूस यासाठी लागू होतो. माणूस माणसाशी आणि पैशांशी कसा वागतो, याचा परिणाम त्याच्या जीवनावर सतत होत असतो. Will & Good Will या बद्दल अधिकारी सरांचा एक संवाद आठवला. संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमीच जास्त असते, कारण संपत्ती असेल तर फक्त विल (Will) तयार होते आणि संस्कार असतील तर गुडविल ( Good Will  ) तयार होते.  किती अर्थपूर्ण आहे , संस्कारांचे महत्व...!

बालवयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वयम वाचक कट्टा हा उपक्रम सुरु आहे. दिवसामाजी काहीतरी लिहावे...प्रसंगी अखंडित वाचीत जावे असे समर्थ रामदास म्हणाले...! वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. योग्य विचारास प्रवृत्त होतो. कार्य-प्रवणतेतून कार्य-प्रवीण होत जातो. वाचनाने माणूस बहुआयामी तर होतोच परंतु आपणास काय कळाले आहे यापेक्षा आपल्याला काय समजावून घ्यायचे आहे, याचा विचार तो प्राधान्याने करू लागतो./ करू शकतो. वाचन-संस्कृतीच्या संवार्धनाची नितांत आवश्यकता आहे. आणि अल्परंभ: क्षेमकरा: या नीती-विचाराने अल्परंभाच्या माध्यामतून वाचन हा विचार रुजण्यासाठी काम सुरु आहे.

मन:पूर्वक धन्यवाद...!

- श्री. अविनाश गोसावी. 

९४२३९६४३१९

 

No comments:

Post a Comment